HW News Marathi
राजकारण

आज भाजपचे उपोषण

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशभरात भाजपचे नेते उपोषणाला बसले आहेत. दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी देखील या एकदिवसीय उपोषणात सहभागी झालेले आहेत. कॉंग्रेसच्या उपोषणाचा फज्जा उडाल्यानंतर भाजपचे उपोषण यशस्वी होणार का ? याकडे सध्या जनतेचे लक्ष लागलेले आहे.

विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन वाया गेल्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपने एकदिवसीय देशव्यापी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

सध्याच्या उपोषणाच्या राजकारणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील व्यथित झाले आहेत. आजच्या उपोषणात भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार आज दिवसभर उपोषण करणार आहेत. पंतप्रधान दैनंदिन कामात व्यस्त असूनही ते आज उपवास करणार आहेत.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत भांडून (पश्चिम) रेल्वे स्टेशन परिसरात ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसलेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १२ वाजल्यापासून विलेपार्ले येथे उपोषणाला बसले आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेचा 56 वर्धापन दिन हॉटेल वेस्ट इनमध्ये होणार साजरा; उद्धव ठाकरे काय बोलणार?

Aprna

कितीही प्रयत्न केलात तरी हे भ्रष्टाचाराचे भूत तुमचा पाठलाग सोडणार नाही !

News Desk

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

swarit
महाराष्ट्र

डॉ गंगाधर पानतावणेंचे स्मारक उभारणार | आठवले

News Desk

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

त्यासाठी दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांची कन्या नंदिता यांच्यासह मान्यवरांना घेऊन दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे फाउंडेशन नावाने ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना करून दिवंगत पानतावणे यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद मध्ये शासनाने जमीन द्यावी यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी दिले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रिपाइं आणि परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित आदरांजली सभेत रामदास आठवले बोलत होते.

यावेळी विचारमंचावर भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, डॉ ऋषिकेश कांबळे, डॉ रोहिदास वाघमारे, सुहास सोनवणे, दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांच्या कन्या नंदिता अवसरमल तसेच केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, भुपेश थुलकर, काकासाहेब खंबाळकर, माजी आमदार सुमंतराव गायकवाड, डॉ प्रीतिष जळगावकर, बि के बर्वे, आशाताई लांडगे, फुलाबाई सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गौतम सोनवणे यांनी केले.

दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनानुसार परिवर्तन साहित्य महामंडळ चालत होते. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते.त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले.त्यांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभले. अनेक साहित्यिक विचारवंत पत्रकार संपादक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून शिवशक्ती भीमशक्ती युतीचा निर्णय आपण घेतला. दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्श नियतकालिकातून आंबेडकरी विचारांचा प्रचार केला आंबेडकरी विचारांचे साहित्यिक घडविले. मला ही त्यांचा आशीर्वाद मिळाला होता असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Related posts

राज्यात १ लाख ९७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप, तर ७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

News Desk

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धच्या तक्रारीची सखोल पोलीस चौकशी

News Desk

मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स

News Desk