HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील पुरग्रस्तांना अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपये रोख

कोल्हापूर । कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपयांची मदत करण्याचे निर्दशने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करणार असल्याची माहीत विभागीय आयुक्त कार्यालयात पूरपरिस्थिती संदर्भातील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली. कोणत्याही खातेदाराला पैसे काढण्यास अडचण निर्माण होणार नाही. बँकेने पासबुक अथवा चेकचा आग्रह धरू नये यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

पूरग्रस्त नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. पुरामुळे बाधीत झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून ४ लाख १३ हजार ९८५ नागरिकांना ५३५ आश्रय शिबीरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात ८०, कोल्हापूर जिल्ह्यात १५० आणि सातारा जिल्ह्यात ७२ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परबांच्या अडचणीत वाढ? सोमय्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाने परबांच्या रिसॉर्टची केली पाहणी

News Desk

जनसामान्यात ‘हरेकृष्ण’ पाहणे हीच खरी ईशसेवा’! –  भगतसिंह कोश्यारी

News Desk

धुळे महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर ! करेक्ट कार्यक्रम गंडला ….

News Desk