HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाची मदत करण्यासाठी आठवलेंची थेट राज्यपालांकडे धाव!

मुंबई | मुंबई महानरपालिकेने अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिल कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (११ सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे यावेळी केली आहे. तसेच तिला नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

“पालिकेने २४ तासांची नोटीस देऊन तोडक कारवाई करत नियमाचे उल्लंघन करत कंगनावर अन्याय केला आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केला जावी,” अशी मागणी रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे केली.“कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारने कोरोनासाठी कठोर पावले उचलावी असे आदेश राज्य सरकारला द्यावेत,” असंही रामदास आठवले यांनी निवेदनात म्हटलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोकर महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी गोपुलवाड रुजू

News Desk

महाविकासआघाडी किंवा राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या जागेसाठी माझा विचार करावा | सुरेखा पुणेकर

News Desk

पुन्हा रेल्वे अपघात; दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डब्बे घसरले

News Desk