HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री जागे व्हा, मुख्यमंत्री न्याय द्या’, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा!

बीड | मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीकडून करण्यात आली आहे. स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रास्तारोको करण्यात आला. ‘मुख्यमंत्री जागे व्हा, मुख्यमंत्री न्याय द्या’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच सरसकट पीकविमा द्या अशी मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी मागणी मान्य न झाल्यास ज्याप्रमाणे पावसानं शेतकऱ्यांना झोडपलं, तसेच सरकारलाही झोडपू, असा इशारा यावेळी स्वाभिमानी युवती आघाडीने दिला आहे.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान केलं. कुठे काढणी झालेल्या सोयाबीनच्या हुंडी वाहून गेल्या. तर कुठे सोयाबीनला जागेवरच बुरशी लागली. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं उभा ऊस आडवा झाला. फुलं, फळबागांचं मोठं नुकसान झालं. भात शेती पुर्णता नष्ट झाली. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर वाया गेललं पीक पाहत अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मविआ सरकारचा चहापानाचा कार्यक्रम; विरोधकांचा बहिष्कार, मुख्यमंत्री गैरहजर

Aprna

Maharashtra Winter Session 2021 : विरोधक महाविकासआघाडी सरकारला ‘या’ मुद्द्यांवर घेणार

Aprna

#COVID19 : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८६८वर, आज दिवसभरात १२० रुग्णांची नोंद

News Desk