HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेवर भाजपचे पहिल्यांदा ६९ खासदार तर बहुमतासाठी १२६

नवी दिल्ली | राज्यसभेत भाजपचे ३८ वर्षात पहिल्यांदाच ६९ खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसचे ५० सदस्य असे संख्या बळ आहे. राज्यासभेत २४५ एकूण सदस्यांची संख्या आहे. राज्यसभेत बहुमतासाठी १२६चा सदस्यांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. राज्यसभेत शुक्रवारी सात राज्यांतील २६ जागांवर निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला १० जागापैकी ९ जागावर भाजप विजय मिळाला आहे.

भाजपला १२६चा आकडा गाठण्यासाठी मित्रपक्षांची गरज आहे. पण, सध्या भाजपचे मित्रपक्ष त्यांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नुकतेच भाजपचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टी यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे एनडीएतून बाहेर पडले आहेत.

राज्यसभेतील १७ राज्यातील ५८ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी ३३ जागावर बिनविरोधी निवड झाली होती. फक्त २६ जागासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील १० जागैपकी ९ जागांवर भाजप निवडून आली. उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यसभेच्या १० जागांवर सर्वांचे लक्ष लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयोगाच्या आधीच भाजप आयटी सेल प्रमुखानं जाहीर केली मतदानाची तारीख

News Desk

लॉकडाऊनंतर सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी काय करावे, पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना

News Desk

भारतीय महिलेचा पाकिस्तानात जबरदस्तीने विवाह

News Desk