HW News Marathi
महाराष्ट्र

पूर्वी ‘चिडी’चा डाव खेळायचे, आता ‘ईडी’चा डाव खेळतात !

मुंबई | “पूर्वी काही येत नसेल तर ‘चिडी’चा डाव खेळायचे, आता मात्र ‘ईडी’चा डाव खेळतात”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपवर हि बोचरी टीका केली आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची भीती दाखवून जबरदस्तीने भाजपमध्ये पक्षांतर करण्यास सांगितले जात आहे, असा आरोप सध्या विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेला भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेषतः या पक्षांतरात राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, नवी मुंबईचे संदीप नाईक, माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ, वैभव पिचड, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी नुकताच आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावरून विरोधकांकडून भाजपवर ईडीची भीती दाखवत असल्याची टीका केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा दिला राजीनामा

News Desk

जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला धक्का; 13 नगरसेवकांची घरवापसी

News Desk

देशमुख, परमबीरांचं कुठे हनीमून सुरू आहे ते शोधा! फडणवीसांचा हल्लाबोल

News Desk