HW News Marathi
महाराष्ट्र

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही !

मुंबई | “मी तेलंगणा, कोयनेचे पाणी महाराष्ट्रात आणेन. आकाश-पाताळ एक करेन, पण पुढच्या ५ वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही”, असे मोठे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर “आम्ही पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही”, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांकरिता मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून (१ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे.

“जनतेच्या आशीर्वादाने राज्यात पुन्हा आमचेच सरकार येईल. त्यामुळे ही पुढची ५ वर्षे आम्हाला दुष्काळाशी दोन हात करण्याकरिता घालवायची आहेत. काहीही झाले तरी आम्ही पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. आम्ही तेलंगणा, कोयनेचे पाणी महाराष्ट्रात आणू. आकाश-पाताळ एक करू. परंतु, येत्या ५ वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू”, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षांत राबविलेल्या सर्व योजनांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला, तर विरोधकांवर सडकून टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाविकास आघाडीला कॉंग्रेस ‘या’ कारणासाठी देणार सोडचिठ्ठी

News Desk

गृहमंत्री अनिल देशमुख गुन्हेगारांच्या गराड्यात,औरंगाबाद दौऱ्याचा एक फोटो झाला वायरल

News Desk

अहो पक्षप्रमुख, खरचं मर्द असाल तर सांगून टाका की शिवसेना  ‘सेक्युलर’ झाली – नितेश राणे

News Desk