HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीला कॉंग्रेस ‘या’ कारणासाठी देणार सोडचिठ्ठी

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेसमध्ये सध्या धुसफूस सुरु असल्याचं दिसत आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणूकांत स्वबळाचा नारा दिला आहे. इतकंच नाही तर आता चंदन शिरवाळेराज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढण्याचा नारा काँग्रेसने दिला आहे. या सर्व निवडणुकांपुरता महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दै. ‘पुढारी’ला दिली आहे.

पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या सत्तेपासून आम्ही महाराष्ट्रात नंबर 1 वर होतो. तो क्रमांक आम्हाला पुन्हा मिळवायचा आहे. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार असले तरी निवडणुकांपुरती राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आम्ही महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार आहोत.विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. मात्र, प्राबल्य नसलेल्या ठिकाणी आम्ही आमची ताकद लावणार आहोत. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, हे महाविकास आघाडीतील पक्षांनी मान्य केले आहे. काँग्रेसही पक्ष वाढविण्यावर भर देणार आहे. त्यामुळे मित्रपक्ष नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, वसई – विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद या मुदत संपलेल्या महापालिका असून मार्च 2022 मध्ये मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या महापालिकांच्या मुदत संपणार आहेत, तर मे 2022 मध्ये भिवंडी, मालेगाव, परभणी, लातूर आणि पनवेल ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मीरा-भाईंदर आणि नांदेड या महापालिकांची मुदत संपत आहे. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदा आणि या दोन्ही जिल्ह्यांतील 15 पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. मार्च 2022 पर्यंत 25,तर जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांच्या मुदत संपणार आहेत. राज्यातील 96 नगरपालिकांची मुदत संपली असून जानेवारी 2022 मध्ये 210 नगरपालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत.

या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे नियोजन काँग्रेसकडून सुरू असल्याचीही पटोले यांनी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्था ही रंगीत तालीम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. मात्र, आमचे खरे लक्ष्य विधानसभा निवडणूक असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणे ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे पटोले म्हणाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील इतर पक्षांच्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं सणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त जीवनदान महाअभियान रक्तदान शिबिर !

News Desk

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये माफी मागणार का?

News Desk

अभियंताला मारहाण केल्याप्रकरणी सोशल मीडियावर आव्हाडांना अतिशय खालच्या भाषेत केले ट्रोल

News Desk