HW News Marathi
देश / विदेश

केंद्र सरकारकडून कृषीसह लघु-मध्यम उद्योगांना दुसरे आर्थिक पॅकेज मिळू शकते ?

नवी दिल्ली | कोरोना वेगाने कोरोनाचा फैलाव होत आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेवर मोठे नुकसात झाला आहे. सध्या देशात फक्त अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय क्षेत्र बंद आहे. लॉकडाऊनचा सर्वा जास्त फटका हा देशातील लघु आणि मध्यम उद्योगावर पडला आहे. यासाठी केंद्र सरकार आर्थथिक मदतीसाठी पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत १ लाख ७० हजार कोटींच पॅकेज जाहीर केले. यात शेतकऱ्यांपासून ते दररोज काम करुन उदरर्निवाह करणाऱ्या कामगारांना देखील मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने लॉकडाउनमुळे फटका बसलेल्या इतर क्षेत्रांना मदती करण्याचे काम सुरू केलेआहे. पुढील काही दिवसात या पॅकेजची केंद्राकडून घोषणा केली जाऊ शकते.

यासाठी पंतप्रधान कार्यालयाने एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीत आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अतनु चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती लॉकडाउनमुळे फटका बसलेल्या क्षेत्रांचा आढावा घेत आहे. यात कृषी क्षेत्राचाही समावेश असून यात बेरोजगार झालेल्या लोकांच्या गरजांवरही अभ्यास करत आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी शिवरायांचा अपमान केला नाही, उलट…! व्यंकय्या नायडूंची पहिली प्रतिक्रिया

News Desk

आरोग्यमंत्री झोपले आहेत का? – संभाजी ब्रिगेड

News Desk

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ; 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna