HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पराकाष्ठा करावी

लातूर | केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारविरोधात जनतेचे मत परिवर्तन होत असले तरी भाजपला सत्तेतून बाहेर काढणे तितके सोपे नाही. म्हणून भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसकडून ‘व्हिजन – २०१९’ या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लातुरमध्ये पार पडलेल्या या शिबिराप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी राज्यमंत्री दिलीप देशमुख, आमदार अमित देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मंदिरांच्या ऐवजी बार उघडे, कल्चरची वाट”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला

News Desk

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा ५४ वा दीक्षांत समारंभ संपन्न, विद्यार्थ्यांना दिले ‘हे’ सल्ले

Aprna

मराठा क्रांती मोर्चा विरोधातली याचिका मागे, समन्वयकांनी घेतली तोडफोडीची दखल

swarit