HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारने १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – महेश तपासे

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेला कराराने औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार असून या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या वेळी सरकारने सुमारे २१ कंपन्यांशी करार केला आहे. त्यापैकी १५ कंपन्यांशी आज करार झाला असून महाराष्ट्रात एकूण ५१ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. तर उर्वरित जानेवारीपर्यंत डझनभर कंपन्यांबरोबर सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. राज्यात १.५० लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

२ कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन देणारे भाजपचे मागील सरकार राहिले बाजुला परंतु महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द पाळला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार केला असून, या गुंतवणुकीमुळे सुमारे २४ हजार लोकांना रोजगार मिळणार अशी सरकारला अपेक्षा असून या अपेक्षेला सरकार नक्की उतरेल असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

News Desk

शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील राष्ट्रवादीत; एकनाथ खडसे गटाकडून शिवसेनेला हादरा

News Desk

देशामध्ये कुणी काय खायचं… कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? – नवाब मलिक

Aprna