HW News Marathi
महाराष्ट्र

शहर सोडून जाऊ नका ,शहरांवर बाॅम्ब पडलेला नाही !

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरूवात झाली आणि लोकांनी शहर सोडून गावांकडे परतायला सुरूवात केली आहे. पुणे,मुंबई स्टेशन आणि बसेस स्थानकावर लोकांची गर्दी जमते आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणालेत , शहरातील नागरिकांनी घर सोडून जाऊ नका, शहरावर कोणत्याही प्रकारची आपत्ती आली नाही. शहरावर काही बॉम्ब पडला नाही

त्याचपद्धतीने पुण्यात आता रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे लोकांनी रक्तदान करावं, असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. त्यांनी आज सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा छोटे रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदान केलं जावं असं आवाहन केलं होतं.

आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की,पुण्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी पडू लागलाय त्या पार्श्वभूमिवर आता लोकांनी रक्तदान करावं पण एका ठिकाणी १५ पेक्षा जास्ती लोकांना जमू नये ,असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला उभे करण्यासाठी रोजगाराभिमुख प्रकल्प उभारावे! – विजय वडेट्टीवार

Aprna

बिहारमध्ये विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल असे वाटते काय? राऊतांचा भाजपला सवाल

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते

News Desk