HW News Marathi
Uncategorized

वर्ध्याहून पायी तामिळनाडूला निघालेल्या २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वाटेत मृत्यू

तामिळनाडू | कोरोनाच्या वाढत्या विळख्याने देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला. मात्र, काही मजूर, कामगार, गोर-गरीब यांना राहायला घरे नसल्याकारणाने त्यांनी आपपल्या गावी जाण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनमूळे सर्व गाड्या, ट्रेन बंद असल्याकारणाने त्यांनी पायी जाण्याचा मार्ग स्विकारला. परंचू, पायी जाणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.

तामिळनाडूतील २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच पायी प्रवास केल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील वर्ध्याहून ५०५० कि.मीचे अंतर तामिळनाडूच्या दिशेने पायी जात असताना वाटेत या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आपल्या घरी पोहोचण्यासाठी या विद्यार्थ्याने वाहतूकीच्या अनेक सोयी वाटेत मिळतील तशा वापरल्या, जेव्हा कोणतेही वाहन मिळाले नाही त्यावेळी चालत ते अंतर पार केल्याची माहिती पोलीसांनी दिली.

पश्चिम तामिळनाडूमधील नमकक्कल येथील रहिवासी बालसुब्रमणि लोकेश हे ३० जणांसह वर्धा येथून निघाले होते कृषी-अन्न क्षेत्रात प्रशिक्षण घेत असलेल्या वर्धा येथून निघालेल्या या ३० जणांसाठी वाटेत एका आश्रयस्थानात रूपांतरित केलेल्या एका फार्म हॉलमध्ये नेण्यात आले व त्यांना भोजनही पुरविण्यात आले होते. दरम्यान, त्यातील काही जणांनी आपण किती अंतर चाललो हे समजलेच नसल्याचे सांगितले. त्यामूळे लोकांना स्थलांतर करण्यास मनाई केली आहे. जिथे आहे तिथेच थांबण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकार वारंवार करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar On Harshwardhan Patil | हर्षवर्धनसाठी भरणे थांबणार होते,पण..त्याला भाजपात जायचं होतं..

Arati More

सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार आज घेणार सोनिया गांधींची भेट

News Desk

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत –  रविशंकर प्रसाद

News Desk