HW News Marathi
मुंबई

#CoronaVirus | वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

मुंबई | राज्यातील आणि विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा तासागणिक मोठ्या प्रमाणात वाढत जाणारा आकडा आता सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. सध्या मुंबईतील दाटीवाटीच्या परिसरांत कोरोनाबाधित रुग्ण आढळायला सुरुवात झाल्याने ही चिंता आणखी वाढली आहे. आता वरळी कोळीवाड्यातील एका कोळी समाजाचे नेते कोरोनामुळे दगावले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलालाही सध्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांपासून खरंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, येथील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनामुळे झालेल्या या पहिल्या मृत्यूमुळे या परिसरात सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. सध्या या परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम सुरु आहे. तर येथील १०८ पैकी ८६ रहिवाशांना सध्या पोदार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडून रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे वरळी कोळीवाड्यात अशी स्थिती असताना दुसरीकडे जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपड्पट्टीतही कोरोनाबाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्या, परिसरांमध्ये कोरोनासंसर्ग सहज फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून, राज्य सरकार या दृष्टीने काय पावले उचलणार हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात २१ कुत्र्यांचे हत्याकांड

News Desk

अनुपम खेर एफटीआयच्या प्रमुखपदी

News Desk

अॅन्टॉप हिल परिसरात भिंत कोसळली

swarit