HW News Marathi
महाराष्ट्र

डोंगरातील इमारतही खेकड्यांमुळे पडली असे जाहीर करून टाका !

मुंबई | मुंबईतील डोंगरी येथील ४ माजली इमारतीचा काही कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकार टीका केली आहे. “डोंगरीतील इमारत देखील खेकड्यांनी पाडली असे आता सरकारने जाहीर करून टाकावे”, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. ते पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा दावा केला होता. याचाच आधार घेत अजित पवार यांनी ही टीका केली आहे.

“मंत्री खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटल्याचे बिनधास्तपणे सांगतात. ते धरण केवढ खेकड्यांचा जीव केवढा, किती खोट बोलावे ?”, असे अजित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे “मुंबईत अनेक ठिकाणी इमारती कोसळून कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असूनही हे सरकार कठोर निर्णय घेत नाही. त्यामुळे आता डोंगरीतील इमारत देखील खेकड्यांनी पाडली असे सरकारने जाहीर करावे”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुण्य नगरी’ वृत्तसमुहाचे प्रमुख मुरलीधर शिंगोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

News Desk

गृहमंत्रीपद स्विकारताचं दिलीप वळसे-पाटील यांचा मोठा निर्णय…

News Desk

कळव्यात घरांवर दरड कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही!

News Desk