HW News Marathi
महाराष्ट्र

एकाच क्रीडा संकुलाचे दोन वेळेस उद्घाटन, होय ! उल्हासनगर में कुछ भी होता है,

  • प्रसिद्धी आणि कामाचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे उपद्व्याप-धनंजय बोडारे

उल्हासनगर शहरातील विविध विकासकामाचे गुरुवारी राज्यमंञी रविंद्र चव्हाण ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.माञ या कामावर शिवसेने व अन्य विरोधी पक्षाने बहिष्कार घातला.एकाच कामाचे पुन्हाःपुन्हा उद्घाटन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या महिन्यांत ६ जानेवारी २०१८ रोजी शहरातील बाळासाहेब क्रीडा संकुलाचे नुतनीकरण आणि १४ नंबर महानगरपलिका शाळेचे उद्घाटन करण्यात आले आणि विध्यार्थ्यांना शाळा आणि नागरिकांना क्रीडा संकुल खुले करण्यात आले,हे उद्घाटन कल्याण चे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडलं.दरम्यान आता कालच (गुरुवारी) 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा वरील वास्तु चं उद्घाटन रायगड चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं.एकदा उद्घाटन झालेल्या वास्तू च पुन्हा उद्घाटन करून येथील सत्ताधारी प्रसिद्धी आणि कामाचे श्रेय लाटण्यासाठी हे उपद्व्याप भाजपाने चालवले असल्याचे शिवसेनेचे उल्हासनगर महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेता धनंजय बोडारे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांनी मला पक्षात घेतले नसते तर मी बाद झालो असतो –  एकनाथ खडसे

News Desk

उदयनराजे भोसले यांची टोल हस्तांतर प्रकरणातून निर्दोष मुक्तता

News Desk

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna
महाराष्ट्र

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit

उल्हासनगर विषारी गॅसच्या गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाला. तर विषारी गॅस नाका-तोंडात गेल्याने ११ कामगारांना गंभीर अवस्थेत कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उल्हासनगर-शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत घडली असून संजय शर्मा (३४) असे गुदमरुन मृत्यू झालेल्या हंगामी कामगाराचे नाव आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत रात्री ९ वाजताच्या सुमाराला गॅसच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच सुमाराला एका गॅसच्या पाईपलाईनमधून विषारी गॅसची अचानक गळती सुरू झाली. यावेळी कुठल्याही प्रकारची कंपनीच्या वतीने कामगारांना सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे हंगामी कामगार संजय शर्मा यांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला असून ११ कामगारांना कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान यापूर्वीही अनेक कामगारांनी विषारी गॅस गळतीमुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र या कंपनीत आजही हंगामी कामगारांना राबवून त्यांच्या सुरक्षेतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आजच्या घटनेवरुन समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच गॅस गळती रोखणाऱ्या पथकासह अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र संजय शर्मा या हंगामी कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्याने कंपनीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर कंपनीच्या ठेकेदाराच्या माहितीनुसार त्याला चार दिवसाचे काम एका दिवसात पूर्ण करण्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Related posts

फोन टॅपिंगचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार – देवेंद्र फडणवीस

News Desk

संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले…

News Desk

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू

Aprna