HW News Marathi
देश / विदेश

राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी

राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आज त्यांच्या कार्यकिर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब आणि तरुणांसाठी घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे.

विरोधकांच्या गोंधळातच वसुंधरा राजे सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. वसुंधरा राजे यांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी एक लाख रोजगारांची निर्मिती करण्याची घोषणा यावेळी केली. तसेच शिक्षण क्षेत्रात ७७ हजार पदे भरणार असल्याचं जाहीर करतानाच अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढविण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानेच वसुंधरा राजे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण  

News Desk

पराभवानंतर राहुल गांधींनी अमेठीला दिली पहिल्यांदा भेट

News Desk

न्यायाधीशांची भरती करताना अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्यात यावे !

News Desk
देश / विदेश

लष्करी अधिकारी मारवाह हनी ट्रॅपच्या जळ्यात

swarit

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयला गुप्त माहिती देण्याच्या आरोपात एअरफोर्सचा ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह (51) याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती आहे की आयएसआयने हनीट्रॅपच्या माध्यमातून मारवाह कडून गुप्त माहिती घेतली आहे. अरुण मारवाह फेसबुकच्या माध्यमातून दोन महिलांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या मदतीने तो माहिती शेअर करत होता.

आयएसआयने फेसबुकवरुन एजेट किरण रंधवा हिने मॉडेल असल्याचे सांगून मारवाहल यांना भुरळ घातली. आठवडाभर अश्लिल गप्पा मारल्यानंतर त्यांनी आयएएफच्या युध्द सरावाची माहिती देण्यास तयार झाले. मारवार यांनी हवाई दलाच्या मुख्यालयातून मोबाइलवर महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्सअॅपवरुन आयएसआयला माहिती पाठवित असल्याची माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी दिली.

काही दिवसांपासून मारवालांच्या हलचाली संशयास्पद वाटल्यामुळे ३१ जानेवारी रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आयएसआयने फेसबुकवरुन अरुण मारवाहला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related posts

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 25 जवान शहीद

News Desk

भारत हिंदूमुक्त करण्याची अल कायदाची धमकी

News Desk

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

News Desk