HW News Marathi
देश / विदेश

राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी

राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आज त्यांच्या कार्यकिर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब आणि तरुणांसाठी घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे.

विरोधकांच्या गोंधळातच वसुंधरा राजे सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. वसुंधरा राजे यांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी एक लाख रोजगारांची निर्मिती करण्याची घोषणा यावेळी केली. तसेच शिक्षण क्षेत्रात ७७ हजार पदे भरणार असल्याचं जाहीर करतानाच अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढविण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानेच वसुंधरा राजे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून पुन्ह एकदा शस्त्रसंधी उल्लंघन, दोन जवान शहीद

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल!

News Desk