HW News Marathi
देश / विदेश

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तानचा काश्मीर प्रश्न हा कायमच धगधगता राहिला आहे. त्यामुळे अनेक दशके लोटल्यानंतर आणि विविध प्रयत्नांनंतरही काश्मीर प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. मात्र आता खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे काश्मीर प्रश्न शांततेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. “युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न सुटेल”, असा विश्वास इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. इम्रान खान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सोमवारी काश्मीर प्रश्नाबाबत भाष्य केले.

”भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर आणि पाकिस्तान सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. युद्ध नव्हे तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न सोडवता येईल. जोपर्यंत चर्चा सुरु होणार नाही तोपर्यंत काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबतच्या कुठल्याही मार्गावर चर्चा करता येणार नाही,” असेही यावेळी इम्रान खान म्हणाले. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन पर्यायांवर चर्चा झाली असल्याचे सांगत त्यांनी त्या पर्यायांबाबत अधिक माहिती देण्यास मात्र इम्रान खान यांनी नकार दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ड्रगप्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी !

News Desk

वासराशी महिलेचा विवाह

News Desk

नकारात्मक क्रूड तेलाच्या किमतीचा अर्थ म्हणजे भारतीय ग्राहक इंधनासाठी कमी पैसे देतात का?

News Desk