HW News Marathi
राजकारण

दिल्लीत ‘अशा’ भेटीगाठी होतच राहतात !

मुंबई | “दिल्ली हे देशातील राजकीय घडामोडींचे केंद्रच आहे. त्यामुळे तिथे अशा भेटीगाठी होतच राहतात. आम्ही इथे कोण कोणाला कशासाठी भेटतो याची डायरी घेऊन बसत नाही”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. “काही लोक जर सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला जाऊन भेटण्यात कुणाची हरकत नसावी”, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (८ जुलै) संध्याकाळी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात असून या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर ते बोलत होते. येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाच्या महापूजेला उपस्थित असतील अशी माहिती मिळत आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना हा टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात !

News Desk

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार

News Desk

#LokSabhaElections2019 : …तर मग मोदींनी सर्वच ४२ मतदारसंघातून निवडणूक लढवावी !

News Desk