HW News Marathi
महाराष्ट्र

परिस्थिती काही करण्यास भाग पाडते

पुणे | परिस्थिती माणसाला काही करण्यास भाग पाडते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेवरुन कळते. पुणे शहरातील वाकड परिसरात असलेल्या यमुना नगरमध्ये काही चोरांनी सोने, चांदी न चोरता चक्क भाजीपाला आणि कपडे चोरल्याची घटनासमोर आली आहे.

या परिसरात वारंवार भाजीपाला चोरींची घटना होत होत्या. त्यामुळे एका भाजी विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. सीसीटीव्हीमुळे हा सर्वप्रकार उघडकीस आला. या भुरट्या चोरांकडून भाजीपालाच नाही तर कपडेही लंपास केले जात आहेत. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून ही पोलीस चोरांना पकडण्यास अपयशी आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने तरी पोलिसांनी या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिककडून होत आहे.

चोरीचे हे प्रकरण तुम्हा आम्हाला विचारात पाडणारे आहे. देशात एका बाजूला तरुण-तरुणी सुशिक्षित होण्याच्या प्रमाण वाढत आहे, दर दुसऱ्याबाजूला सुशिक्षित बेरोजगारचे प्रमाणातही तितकीच वाढ होताना दिसत आहे. नोकऱ्या न मिळाल्यामुळे तरुण-तरुणी हे गैरमार्गाचा वापर करुन आपल्या प्रथमिक गरजा पूर्ण करत आहे.

पण, भाजीपाला आणि कपडे यासारख्या गोष्टी चोरल्या जात असेल तर जे व्यक्ती हे चोरी करत असतील. या चोरी करण्यामागचे नेमके कारण का? असा सवाल येथे उपस्थित होत आहे. पोलिसांनी नव्हे तर तुम्ही आम्ही सर्वांनीच याचा शोध घेणे गरजेचे आहे. म्हणजे आज लोकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या प्रथमिक गरजा देखील पूर्ण होत नाहीत का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपचे खासदार सायकलवरून संसदेत जायचे, ते तुम्ही विसरालात?, मलिकांनी फडणवीसांना डिवचले

News Desk

‘नानाजी तुम्ही वाफा दवडवा,इतर २ सरकार चालवतायतं’ भाजपचा नाना पटोलेंना टोला !

News Desk

महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 1)

News Desk
मुंबई

आईला लाथ मारल्याचा रागातून भाऊजीची हत्या

News Desk

टिटवाळा | सासूच्या पोटात लाथ मारल्याच्या रागातून जावयाच्या शरीराचे ३ तुकडे करून निर्घृण हत्या करणाऱ्या मेव्हण्यासह सासू व पत्नीला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. रविंद्र शिवगण (३०) असे निर्घृन हत्या करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे

याप्रकरणी पत्नी सुषमा (३२), मेव्हणा गौतम मोहिते (२९) आणि सासू अनिता मोहिते (६५) अशी टिटवाळा पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपींचे नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रविंद्रची हत्या केल्यानंतर २ दिवस घरातील शौचालयात त्याचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता.

टिटवाळा-मांडा पश्चिमेस असलेल्या धनगरवाडी परिसरातील एका जंगलात ८ दिवसापूर्वी दुर्गंधी येत असल्याने येथील काही नागरिकांनी झाडाझुडपात पाहणी केली असता, एका गोणीत काहीतरी बांधून टाकलेच्या आढळून आले. याबाबतची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ती दुर्गंधी येणारी गोणी उघडून पाहिली असता, त्यामध्ये एका व्यक्तीचे मुंडके कापून धडावेगळे करून शरीराचे ३ भाग केलेला मृतदेह आढळून आला होता.

यानंतर पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला. मात्र, हत्या होवून ५ दिवस उलटूनही हत्येचा सुगावा लागत नसल्याने या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण गुन्हे पथक व टिटवाळा पोलिसांनी संयुक्तपणे सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी टिटवाळा परिसरातील कोणी बेपत्ता व्यक्ती आहे का याचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना मृताची ओळख पटली आणि तपासाला योग्य दिशा मिळाली.

पोलिसांना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्या मृत व्यक्तीच्या पत्नीच्या हालचालीवरून संशय आल्याने पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिने पती रविंद्र हा त्यांच्या आईवडीलाकडे मुलुंड येथे गेल्याचे सांगितले. मात्र, तो मुलुंडला आला नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. तसेच रविद्र शिवगण हा मजीदबंदर येथे एका खासगी कंपनीत काम करत असल्याने त्याठिकाणीही पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी तो सुमारे ८ दिवसापासून कामावर आला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर २ जानेवारी रोजी रविंद्रच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.

भांडण सोडविताना सासूला मारली लाथ

या खून प्रकरणाच्या तपासादरम्यान ग्रामीण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडाख यांचा मृताच्या पत्नीवर अधिकच संशय बळावल्याने त्यांनी तिला ताब्यात घेवून चौकशी सुरू केली. त्यावेळी तिच्याकडे तिच्या पतीचा फोटो मागितला असता, तिने नकार देत उडवाउडवीचे उत्तरे दिली. यामुळे पत्नी सुषमा, मेव्हणा गौतम, सासू अनिता या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर या हत्येचे खळबळजनक कारण पुढे आले.

रविंद्र याचे २४ जानेवारी रोजी पत्नीशी घरगुती वादातून भांडण झाले होते. त्यानंतर मेव्हणा गौतम व सासू अनिता यांनी भांडण सोडविण्याच्या प्रयत्नात असताना रविंद्रने सासूच्या पोटात लाथ मारली. यामुळे रागवलेल्या मेव्हण्याने रविंद्रच्या डोक्यात मागून फरशीने प्रहार केला. त्यात तो मयत झाला. मात्र, २ दिवस त्याचा मृतदेह घरातील शौचालयात लपवून ठेवला होता. तिसऱ्या दिवशी त्याच्या मृतदेहाचे घरातच ३ तुकडे करून एका गोणीत भरून वेगवेगळ्या ठिकाणी मेव्हणा, पत्नी व सासू यांनी फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने या तिघांना अटक करून आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.

Related posts

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

News Desk

छगन भुजबळ यांच्या प्रकृती बिघडल्यास सरकार जबाबदार | शरद पवार

swarit

मराठा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप राजकीय हेतूने

News Desk