HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे खासदार सायकलवरून संसदेत जायचे, ते तुम्ही विसरालात?, मलिकांनी फडणवीसांना डिवचले

मुंबई | देवेंद्रजी तुम्ही शाळेत होतात तेव्हा १९८४ लोकसभा निवडणुकीत भाजपची संख्या २ गेली होती. त्यावेळी भाजपचे खासदार सायकलीवरून संसदेत जात होते. हे तुम्ही विसरालात का?, असा सवाल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केला. मलिकांनी आज (१३ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “ही लोकशाही आहे, अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही. हे देवेंद्र फडणवीस जेव्हा पवारवर टीका करतात. तेव्हा चमत्कार घडतात. आम्ही २०२४ ला चमत्कार घडवू”, असा विश्वास मलिकांनी व्यक्त केला आहे.

यावेळी मलिक म्हणाले, “शरद पवारांनी पंतप्रधान होतील, असा कुठलाही दावा त्यांनी केलेला नाही. त्या उलट पवारांनी मोदींविरोधात देशातील सर्व राजकीय विरोधकांची एकजूट करून त्यांना २०१४ मध्ये सत्तेतून पायउतार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.” राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमा वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे भाषण करताना म्हणाले, “महाराष्ट्रातील महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही?, असे वक्तव्य त्यांनी केले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका करताना म्हणाले, “तेव्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहाणे वाईट नाही, पण त्यांचा पक्ष १० खासदारांचा आकडाही पार करु शकला नाही.”

भाजप सत्तेचा दुरउपयोग करते

राऊतांवर दिल्लीत FIR दाखळ करण्यात आली यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, “जो कोणी भाजपच्या विरोधात भूमिका घेतात, त्यांच्याविरोधात सत्तेचा दुरउपयोग करून कारवाई केली जाते. या करवाईला संजय राऊत तोंड देतील आणि त्यातही भाजपला उघडे पाडतील”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इको-फ्रेंडली साहित्याला मागणी, सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांची गर्दी

News Desk

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

News Desk

राष्ट्रवादी -शिवसेना -भाजप नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता ? संजय राऊत!

News Desk