HW News Marathi
राजकारण

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार

मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची २०१९ मधील निवडणुकीच्या तयारीसाठी संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक विरोधी पक्ष नेते राध कृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेनेने पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित येऊन यांना हरविण्याची तयारी करत आहे. दादर येथील टिळक भवनमध्ये अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे.

त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात ?

Aprna

राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा दावा

News Desk

नारायण राणेंची खासदारकी काढून घेण्याची मागणी

News Desk
शिक्षण

१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाचा अजब आदेश

News Desk

मुंबई | ‘कोणत्याही कारणाने परीक्षा केंद्रास जाण्यास उशीर झाला, तर पेपर देता येणार नाही’ असा अजब आदेश शिक्षण मंत्रालयाच्या वतीने काढण्यात आला आहे. १०वी आणि १२वी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

विद्यार्थ्यांनी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात जाणे अपेक्षित आहे. जर यातही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ११ वाजेपर्यंत वर्गात जाऊ शकतात. पण, त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांना यायला उशीर झाला तर पेपर देता येणार नाही. शिक्षण मंत्रालयाच्या या अजब निर्णयामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या वेळीस चांगलीच धावपळ होणार आहे.

त्यामुळे लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळे आधीच परीक्षेसाठी निघावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ११ नंतर प्रवेश दिला जाणार नाही.

Related posts

शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांच्या कला – गुणांना वाव दया- पत्रकार शरद पाटील.            

News Desk

कायद्याच्या अंमलबजावणीला घरातून सुरुवात करा

News Desk

सासमीरा इंस्टिट्यूटमध्ये हिंदी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम 

News Desk