HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते !

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मंजूर झाले आणि या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. या आरक्षणाच्या निर्णयानंतर श्रेय घेण्यासाठी मात्र प्रत्येक पक्ष पुढे सरसावला. शिवसेना, भाजप आणि काॅंग्रेस यांच्यात चढाओढ लागली. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप नेत्यांकडून आरक्षणाबाबत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. “काँग्रेस आघाडी सरकारने १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला जातो. यात तथ्य नाही. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते”, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले की, “काँग्रेस आघाडी सरकारकडून १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला विरोधकांकडून केला जात आहे. मात्र यात काही तथ्य नाही. तसेच काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्याने तत्काळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र भाजप सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिले”. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकीय नोकरी क्षेत्रात १२ आणि १३ टक्के आरक्षण मंजूर केले आहे. त्यामुळे राज्यशासनाने मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण हे वैध आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला!

News Desk

फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मितीच्या धोरणास मान्यता; मंत्रिमंडळाचा निर्णय

Aprna

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अन्य पक्षात संवाद साधण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात संवाद साधण्याची गरज – आशिष शेलार

News Desk