HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल

मुंबई | राज्यात सध्या मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण प्रचंड गाजत आहे. या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले आणि भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (९ मार्च) विधानसभेत सचिन वाझेंच्या अटकेची मागीणी केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ते दाबलं असं वक्तव्य केलं होते.

या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यानी आज (१० मार्च) अनिल देशमुकांविरोधाक हक्कभंग दाखल केला आहे. तसेच, त्यांनी असंही म्हटलं आहे की, गृहमंत्री माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, विरोधकांना बोलू दिलं जात नाही. इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप गृहमंत्री देशमुख यांनी केला होता. राज्य सरकार आता या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज माहितीपट, व्याख्यान आणि चित्रपटाचे आयोजन

Aprna

“पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल”, अजित पवारांचा खोचक टोला

News Desk

केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत – देवेंद्र फडणवीस 

News Desk