HW News Marathi
राजकारण

प्रकाश आंबेडकरांच्या अल्प प्रतिसादामुळे विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीच एकत्र !

मुंबई | “यंदाच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागू नये यासाठी कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यास इच्छुक होती. मात्र, याबाबतीत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच दोन पक्ष एकत्र निवडणूक लढवतील”, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आलेल्या अनपेक्षित पराभवाच्या पार्श्वभूमीवर आता हे दोन्ही पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेला झालेल्या चुका विधानसभेत होऊ नयेत यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहेत. या लोकसभेत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभाजनाचा मोठा फटका बसला. म्हणूनच, विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने येत्या विधानसभेतही अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच एकत्र लढतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…भिवंडी मतदारसंघाबाबत

News Desk

निवडणूक वर्षात ‘दारूकामा’चा जीवघेणा धंदा रोखण्याचा ‘जोश’ सरकार दाखविणार ?

News Desk