HW News Marathi
राजकारण

जेडीयूची बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा, भाजपला धक्का

नवी दिल्ली | भाजपसोबत असलेली आघाडी केवळ बिहारपुरतीच मर्यादित ठेऊन बिहारबाहेर स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय जेडीयूने घेतला आहे. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. रविवारी (९ जून) पाटणा येथे पार पडलेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए सरकारने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. देशभरात एनडीएने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशात त्यांच्या मित्र पक्षांचाही वाटा मोठा आहे. मात्र, भाजपकडून जेडीयूला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे, जेडीयूमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत होता.

जेडीयूची भाजपसोबत असलेली आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित ठेऊन बिहारबाहेर स्वबळावर लढण्याचा निर्णय जेडीयूकडून घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा, दिल्ली इत्यादी राज्यात येत्या वर्षभराच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेडीयू स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा जेडीयूकडून करण्यात आली आहे. जेडीयू एनडीएमधून बाहेर पडेल अशी चर्चा गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात रंगत होती. मोदींच्या मंत्रिमंडळात जेडीयूला एकही मंत्रिपद न दिल्याने जेडीयूमध्ये नाराजी होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री दशरथ भांडे यांचा फडणवीस सरकारला अल्टिमेटम

News Desk

पर्रीकर आज गोव्यात दाखल होणार !

News Desk

हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

News Desk