HW News Marathi
महाराष्ट्र

आर्यभट्टांनी शोध लावलेल्या शुन्याचा वापर भाजपाने जास्त केला

बीड | बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल (३ फेब्रुवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार रोहित पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. अनेक विषयांवर भाष्य करत या बैठकीत रोहित पवार यांनी “शून्याचा शोध हा आर्यभट्टांनी केला आणि शून्याचा सर्वात जास्त वापर हा भाजपने केला आहे,” अशी टीका करत भाजपवर जोरदार निशाणा साधला.

“भाजपची काही पिलावळ सतत महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे म्हणतात आणि पुढचे किमान ६० महिने तरी ते असेच म्हणत राहणार. महाविकासआघाडीचे हे सरकार शेवटपर्यंत टिकेल, हे सरकार पडणार नाही,” असा विश्वासही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. “त्यामुळे जर ही लोकं आली, तर त्यांना सांगा पाच वर्षांनी बघू,” असेही रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना निष्ठून सांगितले.

येणाऱ्या काळात कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असे कोणीही असल्यास त्यांनी जर पक्षासाठी कष्ट घेतले असतील तर त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर रोहित पवार हे पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले होते. रोहित पवार बीडमध्ये पोहोचताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या आजूबाजूला सेल्फीसाठीही गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या या सेल्फीच्या गराड्यात अडकलेल्या रोहित पवारांची आमदार संदीप क्षीरसागर आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तब्बल दीड तासांनी सुटका झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे पहिले सरकार आहे जे सांगते की, आमचे राज्यपालांसोबत खुले युद्ध आहे – सुधीर मुनगंटीवार

News Desk

19 पैकी नऊ आमदारांचे निलंबन मागे

News Desk

कॅगपासून माहिती लपवलेले ‘ते’ अधिकारी निलंबित, धनंजय मुंडेंची विधानसभेत घोषणा

News Desk