HW News Marathi
मुंबई

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

पुणे- जेजुरी- राजेवाडी स्टेशनदरम्यान दरोडेखोरांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा टाकला. प्रवाशांकडून सोन्याचे दागिने, पैसे आणि मोबाइल लुटण्यात आले आहे. बुधवारी मध्य रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधवारी रात्री मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती.

एक्स्प्रेस दीड ते पावणे दोनच्या सुमारास जेजुरी-राजेवाडी स्टेशनजवळ पोहोचली. दरोडेखोरांच्या पाच ते सहा टोळ्यांनी सिग्नलमध्ये बिघाड करुन गाडी थांबवली. दरोडेखोर डब्यांमध्ये घुसले. त्यांनी 10 ते 15 मिनिटांत प्रवाशांकडून मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. या प्रकरणी सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर रेल्वे पोलिसांत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिक्षक मतदार संघात बोगस मतदारांवर होणार कारवाई

News Desk

पालघर प्रकरणाची बाजू मांडणाऱ्या वकीलाचा अपघाती मृत्यू, भाजपची चौकशीची मागणी

News Desk

महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव मर्सिडीजने एका पादचाऱ्याला चिरडले

News Desk
मुंबई

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

News Desk

मुंबई – मुंबई विद्यापिठात निकालांचा झालेला गोंधळाला विद्यापिठाते व्हाईस चांसलर म्हणजे व्हिसी डॉ. संजय देशमुख यांना जबाबदार धरत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र सर्व जबाबदारी व्हिसींवर टाकून त्यांना बडतर्फ करणे ही पळवाट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. व्हिंसींना जर बडतर्फ केले जात असेल तर शिक्षण खाते सांभाळणारे शिक्षण मंत्री व्हिटी म्हणजेच विनोद तावडेंनाही बडतर्फ केले पाहीजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. मलिक यांनी यावेळी तावडे यांची संभावना व्हि. टी. अशी केली. तावडे हे अकार्यक्षम मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी केला. बोगेस डिग्री घेणारा शिक्षण मंत्री बोगस काम करत आहे असा टोलाही त्यांनी तावडेंना लगावला.

मुंबई विद्यापिठाचे संपूर्ण जगात एक वेगळे स्थान आहे. पण या निकाल प्रकरणा वरून संपूर्ण जगात या विद्यापिठाची नाचक्की झाली आहे. त्याला देशमुख आणि तावडे हे दोघेही जबाबदार आहेत. देशमुख यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने वारंवार केली होती. मात्र त्यांना अभय दिला जात होता. आता त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तशीच कारवाई आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांवर करावी असेही ते म्हणाले.

Related posts

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपत घोषणाबाजी

News Desk

मुंबईतील चर्चिल चेंबर इमारतीला भीषण आग

News Desk

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk