HW News Marathi
मुंबई

पालघर प्रकरणाची बाजू मांडणाऱ्या वकीलाचा अपघाती मृत्यू, भाजपची चौकशीची मागणी

मुंबई | पालघर येथे जमावाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या साधूंची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ बुधवारी सकाळी कार उलटून हा अपघात झाला. त्यात वकिलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे. हा अपघात म्हणजे निव्वळ योगायोग होता का, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत केला आहे. तर महाराष्ट्राने ही केस CBIकडे सोपवावी अशी मागणी भाजपने केली आहे.

काय होते प्रकरण ?

एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला पालघरमधील गडचिंचोले गावात महंत कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज या दोन साधूंसह त्यांचा कार चालक नीलेश तेलगडे याची जमावानं लाठ्याकाठ्या आणि दगडानं ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळे देशभरात राजकीय वादळ सुरु झाले होते. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका झाली होती. तसंच, विश्व हिंदू परिषदेने सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. या प्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोनोरेलने गाठला १ सप्टेंबरचा मुहूर्त

Gauri Tilekar

प्रकाश आंबेडकरांच्या एल्गार मोर्चाला सुरुवात

News Desk

भाजपाच्‍या उमेदवारी निवडीची प्रक्रिया पारदर्शी पध्‍दतीने

News Desk