HW News Marathi
क्राइम

उंदीर मारण्याचे औषध घेऊन तरूणाची आत्महत्या

मुंबई – व्हॉट्सअपवर सुसाइट नोट टाकून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत गोरेगाव पुर्वेला राहणा-या 24 वर्षीय तरुणाने उंदीर मारण्याचे औषध घेतले. शमुवेल घोरपडे असे तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केली होती. तरुणाने आपले नातेवाईक आणि मित्रांना ही सुसाईट नोट पाठवली होती. अशोक नगरमध्ये राहणाºया शमुवेल घोरपडे याने पाठवलेला मेसेज पाहून घोरपडे कुटुंबियांची झोपच उडाली. मेसेजमध्ये लिहिलं होतं की, ‘मी आत्महत्या करत आहे. मी जीव देत असून यासाठी कोणीही जबाबदार नाही’. शमुवेल घोरपडेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मेसेज सकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आला होता. मेसेज आल्यानंतर कुटुंबियांनी शमुवेलचा शोध घेण्यासाठी धावाधाव सुरू केली.

खूप वेळ शोध घेऊनही शमुवेलचा काही पत्ता लागत नव्हता. अखेर एका रिक्षामध्ये शमुवेल मृतावस्थेत आढळला. कुटुंबियांनी यानंतर वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी शमुवेलला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंट्रलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शमुवेलचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकत देवाचे आभार मानले आणि शमुवेलला घेऊन घरी आले. परंतु दुसºया दिवशी पुन्हा त्याला त्रास सुरू झाला. संपूर्ण शरिरात विष भिनले होते. अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू

News Desk

सीबीआयकडून युक्तीवाला सुरूवात

News Desk

दाऊदला आणलंत तरी घाबरणार नाही, किरीट सोमय्या यांचं आवाहन

News Desk
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

मुरुडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk

‘त्या’ शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला विकत घेऊन धनंजय मुंडेंनी दिला दिलासा

News Desk

गौरी सावंत यांच्या तृतीयपंथी मातृत्वाची उलगडली कथा !

News Desk