HW News Marathi
क्राइम

बलात्कार आरोपातून पतीची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्या विवाहितेकडे वकिलाची सेक्सची मागणी

अहमदाबादः आपल्या पतीची बलात्काराचा आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यासाठी झगडणाऱ्या एका सुंदर विवाहित महिलेकडे सेक्सची मागणी केल्याप्रकरणी एका वकीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही विवाहिता पेशाने आर्किटेक्ट आहे. तिच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याची सुटका करण्यासाठी तीने एका वकिलाशी संपर्क साधला असता तो वकीला तिला आपल्या कारमध्ये घेऊन गेला व सेक्सची मागणी करू लागला.

याप्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने वकिलाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुजरातच्या वेजालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. दरम्यान, आपल्या बदनामीचा हा प्रकार असल्याचे वकीलाचे म्हणणे आहे. तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास करण्यास सुरुवात केली आहे. तक्रार दाखल करणारी महिला आर्किटेक्ट विवाहीत असून तिच्या पतीवर बलात्काराचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई एपीएमसीत नाल्यामध्ये निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे…

News Desk

कपिल शर्मावरील एफआयआरला स्थगिती

News Desk

‘माझी वर्दी राष्ट्रपतींनी दिलेली, ती उतरवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना शुभेच्छा’- समीर वानखेडे

News Desk
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

“नागपूरमध्ये जे काही करायचं आहे ते केलं आहे”, फडणवीसांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

News Desk

युजीसीच्या परीक्षांच्या निर्णयावरून वरुण सरदेसाई आणि आशिष शेलार आमने-सामने

News Desk