HW News Marathi
राजकारण

२३ मेपर्यंत वाट पहा, तेव्हाच सत्यपरिस्थिती समोर येईल !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) संध्याकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तसंस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल्सनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्येही एनडीएला बहुमत मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.”विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील अनेक एक्झिट पोलमार्फत काँग्रेसचा पराभव होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निर्णय काय आला ते सर्वांनी पाहिले आहे”, असे विधान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे.

“लोकसभेचा प्रत्यक्ष निकालात काँग्रेसच्या जागा वाढलेल्या दिसतील आणि भाजपची जुमलेबाजी लोकांसमोर येईल”, असा दावा देखील कमलनाथ यांनी केला आहे. “२०१८ मध्ये पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील अनेक एक्झिट पोलमार्फत काँग्रेसचा पराभव होईल, असाच अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात काय घडले, निवडणुकांचा निकाल काय लागला हे आपण सर्वचजण जाणतो. लोकसभेच्या निकालांची २३ मे पर्यंत वाट पहा. तेव्हाच खरी स्थिती समोर येईल”, असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते !

News Desk

नुसती ‘फडणवीसी’ करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय! – उद्धव ठाकरे

Aprna

आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आंदोलकांनी अहिंसा आणि शांततेचा मार्ग अवलंबावा

News Desk