HW News Marathi
कृषी

रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ

मुंबई- राज्यात यंदाच्या झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यंदा रब्बीच्या क्षेत्रात तब्बल चार लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाने विविध राज्यांच्या रब्बी नियोजनाची माहिती घेतली आहे.

महाराष्ट्रत मात्र रब्बी ज्वारी आणि गव्हापेक्षा जास्त भर हरभरा क्षेत्र वाढविण्याकडे राहणार आहे. खरिपाखालील एकूण क्षेत्र देखील दुबार पिकांकडे जास्तीत जास्त वळविण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सध्या दुबार पेरणीखालील क्षेत्र ५५ लाख हेक्टरच्या आसपास आहे. यंदाचा चांगला पाऊस झाल्यामुळे या क्षेत्रात किमान ५९ लाख हेक्टरपर्यंत वाढ करण्याचे नियोजन आहे. त्यात मुख्यत्वे हरभरा आणि त्यानंतर गहू व ज्वारीचा समावेश आहे.

उत्तर भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये रब्बी हंगामाची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात गव्हाऐवजी हरभरा उत्पादनावर भर दिला जाणार आहे, असे दिल्लीतील बैठकीतून परतलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

1 नोव्हेंबरपासून यंदाचा उस गाळप हंगाम

News Desk

रासायनिक खत विक्रीसाठी निर्बंध

News Desk

शेतकरी मदतीबाबत सरकारने शब्द फिरवल्यास हक्कभंग आणणार ! विखे पाटील

News Desk
महाराष्ट्र

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव-शरद पवार एकत्र

News Desk

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खूद्द शरद पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या भेटीची राजकीय वतुर्ळात मात्र वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Related posts

गारपिठीमुळे पिकांप्रमाणे शेतकऱ्यांची घरही कोसळली

News Desk

माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

News Desk

आर्थिक संकट लक्षात घेता, येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा !

swarit