HW News Marathi
कृषी

रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ

मुंबई- राज्यात यंदाच्या झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यंदा रब्बीच्या क्षेत्रात तब्बल चार लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाने विविध राज्यांच्या रब्बी नियोजनाची माहिती घेतली आहे.

महाराष्ट्रत मात्र रब्बी ज्वारी आणि गव्हापेक्षा जास्त भर हरभरा क्षेत्र वाढविण्याकडे राहणार आहे. खरिपाखालील एकूण क्षेत्र देखील दुबार पिकांकडे जास्तीत जास्त वळविण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सध्या दुबार पेरणीखालील क्षेत्र ५५ लाख हेक्टरच्या आसपास आहे. यंदाचा चांगला पाऊस झाल्यामुळे या क्षेत्रात किमान ५९ लाख हेक्टरपर्यंत वाढ करण्याचे नियोजन आहे. त्यात मुख्यत्वे हरभरा आणि त्यानंतर गहू व ज्वारीचा समावेश आहे.

उत्तर भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये रब्बी हंगामाची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात गव्हाऐवजी हरभरा उत्पादनावर भर दिला जाणार आहे, असे दिल्लीतील बैठकीतून परतलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांना शेतकऱ्यांपेक्षा माधुरी महत्त्वाची | अशोक चव्हाण

News Desk

महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार जाहीर

swarit

फळं खरेदीसाठी चीनी व्यापारी शेतक-यांच्या बांधावर

News Desk