HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना इतके का घाबरतात ?

मुंबई | ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (१७ मे) पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या या पत्रकार परिषदेवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मानसिक पराभव मान्य केला आहे”, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. “पंतप्रधान मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना इतके का घाबरतात ?”, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

“पंतप्रधान मोदींच्या पत्रकार परिषदेबद्दल काहीही न बोलणेच बरे आहे. ते स्वतःच काही बोलले नाहीत, तर मग आपण काय बोलायचे. गेल्या ५ वर्षात ते पत्रकारांना सामोरे गेले नाहीत. पंतप्रधान मोदी पत्रकारांना इतके का घाबरतात ? हे त्यांनी स्वत:च सांगावे. पंतप्रधान मोदींनी असे काय केले कि ज्यामुळे तुम्ही पत्रकारांपासून पळत आहेत ?”, असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच पत्रकार परिषद घेतली. मात्र, यावेळी मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता एकतर्फी संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी संसदेचे देखील महत्त्व कमी केले !

News Desk

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अंमलबजावणी करा !

News Desk

राफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही | शरद पवार

News Desk