HW News Marathi
महाराष्ट्र

राज, उद्धव यांची पुढची पिढी एकत्र

मुंबई- राजकारणाच्या पटावर एकमेकांचे पक्के वैरी असलेले उद्धव व राज ठाकरे यांची पुढची पिढी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे शनिवारी रात्री लोअर परळमधील ख्यातनाम हॉटेलमध्ये एकमेकांना भेटल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र, दोघे भाऊ फुटबॉलप्रेमामुळे एकत्र आल्याचे समजते. प्रीमिअर फुटबॉल लीग स्पर्धेच्या आयोजनात अमित ठाकरे यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूही सहभागी झाले आहेत. या खेळाडूंना भेटण्याची इच्छा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली होती. यानिमित्त आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट झाली. दोघांनी एकत्र जेवण केले. या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची घाई करू नये, असे राजकीय विश्लेषकांचे सांगितले. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेदेखील एकत्र आले होते. पण त्यानंतरही दोन्ही पक्षांची युती झाली नव्हती याकडे अनेकांनी लक्ष वेधले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तुम्ही २०००मध्ये काय केले? ठाकरेंचा पवारांना उलट सवाल

News Desk

रिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय, दरेकरांचा राऊतांना टोला

News Desk

… देवेंद्र फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती?, भास्कर जाधव आक्रमक

Aprna
राजकारण

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk

नवी दिल्ली | ‘पंतप्रधान मोदींनी संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी. आपल्या वागणुकीतून त्यांनी सर्वांसमोर एक चांगले उदाहरण तयार करायला हवे. त्यांची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी’, असा खोचक सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना दिला आहे. ते माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

‘यूपीए सरकारच्या काळात भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मी कधीही भेदभाव केला नाही. मी पंतप्रधान असताना जेव्हा भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांचा दौरा करायचो तेव्हा माझे भाजपच्या नेत्यांसोबत चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान देखील ही गोष्ट मान्य करतील”, असेही मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सध्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींकडून विरोधकांवर टीका करताना टोकाची भाषा वापरली जात असून मनमोहन सिंग यांनी दिलेला हा सल्ला याच संदर्भाने असू शकतो, असे म्हटले जात आहे.

Related posts

राज्यातील तरुणाईच्या जोरावर आम्ही पुन्हा स्वराज्य स्थापन करणार !

Gauri Tilekar

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

News Desk

मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार | राधाकृष्ण विखे पाटील

News Desk