HW News Marathi
महाराष्ट्र

उद्योगपतीच्या मुलाच्या मारेकऱ्याची जेलमध्ये हत्या

नागपूर- सुरूची मसालेवाला यांचा मुलगा कुश कटारिया याची हत्या करणारा आरोपी आयुष पुगलिया याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातच हत्या करण्यात आली. कैद्यांच्या आपापसांतील भांडणानंतर त्याची हत्या झाली. नागपूर खंडपीठाने अपहरण आणि हत्याचा दोषी आयुष पुगलियाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. आज सकाळी साडे सातच्या सुमारास नागपूर कारागृह परिसरात सहकारी कैद्यांनी त्याची हत्या केली. कैद्यांनी अवजड टाईलने त्याच्या डोक्यात प्रहार केला आणि रक्ताच्या थारोळ्यात सोडून निघून गेले. त्यानंतर आयुष पुगलियाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर जेल प्रशासनाने धंतोली पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. कैद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.पोलिसांनी आयुष पुगलियाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलं आहे. अहवालानंतरच त्याच्या हत्येचं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा म्हणजे देशाला धोकाचं!- गृहमंत्री दिली वळसे पाटील 

News Desk

मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द!

News Desk

मंदिरे, गडकिल्ले आणि स्मारकांचे जतन आणि संवर्धन शास्त्रोक्त व कालबद्धरित्या करण्यात यावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna
मुंबई

हार्दिक पटेलवर शाई फेक

News Desk

मुंबई | मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये हार्दिक पटेल यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मिलिंद गुर्जर या युवकाने हार्दिक पटेलवर शाईफेक केली.

उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली. असून प्रकारानंतर हार्दिक पटेलच्या समर्थकांनी गुर्जरला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी मिलिंद गुर्जरला अटक केली आहे.

स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला.

हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने व्यापमं घोटाळ्यावरुन शिवराजसिंग चौहान सरकारवर निशाणा साधला होता.

Related posts

अंधेरी पश्चिम परिसरातील ११ उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामे तोडली

swarit

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna

ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ नाही, सर्वसामान्यांना दिलासा

News Desk