HW News Marathi
मुंबई

लोकल अजूनही रुळांवर येईना!

मुंबई – जलप्रलयानंतर तिसऱ्या दिवशीही मुंबईची जीवनवाहिनी अद्याप पूर्णत: रुळावर आलेली नाही. तांत्रिक बिघाडमुळे कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद आहे. त्याचबरोबर सीएसटी ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १५ मिनिटे, तर हार्बरची वाहतूक तब्बल एक तास उशिराने सुरू आहे.

मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाल्याचा परिणाम काही प्रमाणात रेल्वे सेवेवर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारच्या पावसानंतर बुधवारी रेल्वेसेवा पूर्वपदावर आली होती. मात्र गुरुवारी पुन्हा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. प्रत्यक्षात तुरळक सरी वगळता, बुधवार कोरडा गेला. याच काळात शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

swarit

आज पुन्हा मध्य रेल्वेचा खोळंबा, खडवली स्थानकाजवळ रुळाला तडे

News Desk

गणेश विसर्जनावेळी बेपत्ता झालेल्या साईशचा मृतदेह सापडला

News Desk
मनोरंजन

भारतीय परंपरेचा ठेवा मुंबईकरांच्या भेटीला

News Desk

मुंबई | हातमाग क्षेत्रामध्ये भारतीय कलाकार अत्यंत उच्च दर्जाचे मानले जातात. भारतीय हातमागाला जागतिक पातळीवर एक वेगळाच दर्जा आहे. मात्र असे असून सुद्धा निव्वळ विपणन कलेत तरबेज नसल्याने हे कलाकार जागतिक स्पर्धेत आपल्याला दिसत नाही. कलाकारांची ही व्यथा लक्षात घेऊन या कलाकारांसाठी आर्ट एक्स्पो संस्थेच्या उज्वल सामंत यांनी काळा घोडा येथील कुमारस्वामी सभागृह येथे प्रदर्शन आयोजित केले आहे.२१ नोव्हेंबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८ यादरम्यान सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. उत्पादक आणि डिझायनर्स थेट तुमच्या भेटीला असणार आहेत

या प्रदर्शनामध्ये संपूर्ण भारतातील हातमाग व हस्तकलेमध्ये वाकबगार असणारे विविध कलाकार आपली कला सादर करणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या वस्त्रनिर्माते आणि डिझायनर्सचा समावेश आहे. अनोखे भारतीय दागिने, मनमोहक चित्रे, हस्तकलेच्या सुंदर वस्तू,गृहसजावटीच्या वस्तू आदींचा देखील या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात हातमाग व विणकाम क्षेत्रातल्या राष्ट्रीय पुरस्कार पटकवलेल्या विजेत्या कारागिरांचा सहभाग आहे. भारतीय परंपरेचा ठेवा जपणाऱ्या या कलेला जगापुढे आणण्यासाठी व या क्षेत्रातल्या होतकरु कलाकारांना एकत्र आणून हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आर्ट एक्स्पो सातत्याने कार्यरत आहे. इतकंच नव्हे तर ह्या प्रदर्शनासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. कलेची आवड असणाऱ्या व नवनवीन आकर्षक वस्तूंची खरेदी करु पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणीच ठरेल.नुकतेच या कार्यक्रमाचा शुभारंभ झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येउ द्या’ फेम ‘श्रेया बुगडे’ यांच्या हस्ते झाला . यावेळी जर तुम्हाला एकाच छताखाली भारतीय संस्कृतीची विविध रूपे पहायची असतील तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या असे श्रेया बुगडे म्हणाली.

ज्या व्यक्तीस भारतीय कलेचा अभिमान असेल आणि कलेविषयी अभिजात सौंदर्य असेल त्यांनी एकदा तरी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आर्ट एक्स्पोच्या संचालिका उज्वल सामंत यांनी केले आहे.

Related posts

मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे गजक

News Desk

दिवाळीच्या फराळासाठी घरच्या घरी करा ‘नाशिक चिवडा’

swarit

Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांच्या ‘या’ आवडत्या साडीचा होणार लिलाव

News Desk