HW News Marathi
महाराष्ट्र

बैलगाडी शर्यतीवर बंदीच!

मुंबई : दक्षिणेकडील राज्यांमध्ये चालणाऱ्या जलिकट्टू या प्राणघातक खेळाला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीलाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत होती. राज्य शासनाने अधिसूचना काढून या शर्यतींवरील बंदी उठविलीदेखील, परंतु आता न्यायालयाने ही बंदी कायम ठेवणारे आदेश दिले आहेत. त्यामुळे शर्यत शौकीनांचा हिरमोड झाला आहे.

बैलगाडी शर्यत हा क्रूर खेळ असल्याचे सांगत, सुधारित कायद्याची नियमावली तयार करेपर्यंत राज्य सरकारने शर्यतीला परवानगी देऊ नये, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले. बैलगाडा शर्यतीवर बंदी येऊ नये,यासाठी प्रीव्हेन्शन टू क्रुअल्टीकायद्यात सुधारणा करून ३१ जुलैला राज्य शासनाने अधिसूचना काढली. याअधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुण्यात आजआयोजित करण्यात आलेल्या शर्यतीवर गंडातर येण्याची शक्यता आहे. या शर्यतीस व अधिसूचनेला पुण्याचे रहिवासी अजय मराठे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बैल हे घोड्याप्रमाणे वेगाने धावण्यासाठी नसून, ते कष्टाच्या कामासाठी आहेत. शर्यतीत त्यांनी वेगाने धावावे, यासाठी त्यांना इजा करण्यात येते, असे मराठे यांच्या वकील कल्याणी तुळणकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन; वयाच्या ९३व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Aprna

लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांनी पुन्हा धरली घरची वाट!

News Desk

हा माणूस मुख्यमंत्री पदाच्या लायक नाही – नारायण राणे

News Desk