HW News Marathi
देश / विदेश

१८ तारखेला काढणार मोर्चा

नवी दिल्ली: राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दलित मुद्यावर भाजपला घेरण्याचे नियोजन केले आहे. त्या दर महिन्याच्या १८ तारखेला मोर्चा काढणार आहेत. या अभियानाची सुरूवात १८ सप्टेंबरपासून होणार असून १८ आॅक्टोबरपर्यंत हे मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. रविवारी दिल्लीत पक्षाच्या सर्व पदाधिकारी, समन्वय, आमदार आणि राज्यसभा खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मायावती सहारनपूर दंगल आणि दलितांवरील अन्यायाचा मुद्दा मोर्चामधून उठवणार आहेत. दलितांचा आवाज मजबूत करण्यासाठी आपण राज्यसभेचा राजीनामा दिल्याचे त्या लोकांना सांगणार आहेत. जाणूनबुजून मला राज्यसभेत सहारनपूर दंग्यांबाबत बोलण्यास दिलेले नाही माझा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी घोषणाबाजी केली. अशावेळी राजीनामा देऊन लोकांमध्ये जाऊन आवाज उठवणे योग्य हेच मला योग्य वाटले, असे मायावती म्हणाल्या.

मायावती म्हणाल्या, आमचा पक्ष लोकांना मोठ्या प्रमाणात संघटित करून भाजप आणि एनडीएनला सत्तेबाहेर करून जातीयवाद आणि हुकूमशाहीपासून जनतेला मुक्ती मिळवून देईल. सुरूवातीला आम्ही १८ आॅगस्टपासून हे अभियान सुरू करण्याची तयारी केली होती. पण पावसाळा लक्षात ठेऊन १८ सप्टेंबरपासून हे अभियान सुरू केले जाईल. १८ तारखेलाच सहारनपूर दंगलीचा मुद्दा उठवला आणि त्याचदिवशी राज्यसभेचा राजीनामा दिला. त्यामुळे १८ तारखेलाच हे अभियान करण्यात येणार असल्याचे सांगत १८ तारीख ठरवण्यामागचे कारण सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणुकीत गुन्हेगार नेत्यांवर बंदी ?

swarit

संजय राऊत दिल्लीत, भाजप नेत्यांची भेट घेणार?

News Desk

भारताने युद्धाची भाषा केली तर मंदिरातील घंटानाद कधीही ऐकू येणार नाही !

News Desk
मुंबई

महाराष्ट्राच्या हितासाठी अंहकार बाजूला ठेवला-उद्धव

News Desk

राज्यात २५ वर्षानंतर युतीची सत्ता आली. महाराष्ट्राचे भलं करण्यासाठी एक प्रयोग म्हणून भाजपसोबत सत्तेत एकत्र आलो, असं सांगतानाच भाजपसोबत कितीही वाद असले तरी अहंकार बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या हितासाठीच कमीपणा घेऊन सत्तेत थांबलो, असा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करतानाच सावध पवित्राही घेतला. अडीच वर्षे झालीत. आता पहिला टप्पा कर्जमुक्तीचा आला. त्यानंतर समृद्धी महामार्गाचा आहे. विकासाच्या आड आम्ही आलेलो नाही. परंतु शेतकऱ्यांची राखरांगोळी करून आम्ही समृद्धीचा विकास होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

केवळ सरकार मदत देतय म्हणून बुलेट ट्रेन करणं योग्य नाही. त्यात पैसाही जातोय आणि नुकसानही होतयं, असं सांगतानाच खरंच मुंबईला बुलेट ट्रेनची गरज आहे काय? मुंबईचे किती लोक अहमदाबादला जाणार आहेत? मुंबईच्या किती लोकांना अहमदाबादला जाण्याची गरज लागते?, असा सवालही त्यांनी केला.

तर एकला चलो रेचा मार्ग कायम

युतीचे संबंध तुटलेले आहेत. ते संबंध पूर्ववत करणे म्हणजे यू-टर्न नाही. आताशी येणे-जाणे सुरू झाले आहे. हे संबंध का बिघडले? कुठे तुटले? यावर मनमोकळी चर्चा झाली तर सुधारणा होईल, अन्यथा ‘एकला चलो रे’चा मार्ग पत्करला आहे, तो तसाच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना शत्रू? मग चीन आणि पाकिस्तान कोण?

भाजपच्या शिबिरांमध्ये शिवसेना नंबर एकचा शत्रू असल्याचे सांगण्यात येते, त्यावर काय वाटतं, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर शिवसेना शत्रू वाटत असेल तर मग चीन आणि पाकिस्तान कोण? असा सवाल करतानाच शिवसेना नंबर वनचा शत्रू असल्याने त्यांचं चीन आणि पाकिस्तानकडे दुर्लक्ष झालं असावं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. उद्या जर युद्ध भडकलेच तर हिंदुस्थानची त्याला तयारी आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

Related posts

युती तुटल्यास शिवसेनेला ‘दे धक्का’साठी भाजपाची रणनीती

News Desk

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

News Desk

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

News Desk