HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्राच्या हितासाठी अंहकार बाजूला ठेवला-उद्धव

राज्यात २५ वर्षानंतर युतीची सत्ता आली. महाराष्ट्राचे भलं करण्यासाठी एक प्रयोग म्हणून भाजपसोबत सत्तेत एकत्र आलो, असं सांगतानाच भाजपसोबत कितीही वाद असले तरी अहंकार बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या हितासाठीच कमीपणा घेऊन सत्तेत थांबलो, असा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करतानाच सावध पवित्राही घेतला. अडीच वर्षे झालीत. आता पहिला टप्पा कर्जमुक्तीचा आला. त्यानंतर समृद्धी महामार्गाचा आहे. विकासाच्या आड आम्ही आलेलो नाही. परंतु शेतकऱ्यांची राखरांगोळी करून आम्ही समृद्धीचा विकास होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

केवळ सरकार मदत देतय म्हणून बुलेट ट्रेन करणं योग्य नाही. त्यात पैसाही जातोय आणि नुकसानही होतयं, असं सांगतानाच खरंच मुंबईला बुलेट ट्रेनची गरज आहे काय? मुंबईचे किती लोक अहमदाबादला जाणार आहेत? मुंबईच्या किती लोकांना अहमदाबादला जाण्याची गरज लागते?, असा सवालही त्यांनी केला.

तर एकला चलो रेचा मार्ग कायम

युतीचे संबंध तुटलेले आहेत. ते संबंध पूर्ववत करणे म्हणजे यू-टर्न नाही. आताशी येणे-जाणे सुरू झाले आहे. हे संबंध का बिघडले? कुठे तुटले? यावर मनमोकळी चर्चा झाली तर सुधारणा होईल, अन्यथा ‘एकला चलो रे’चा मार्ग पत्करला आहे, तो तसाच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना शत्रू? मग चीन आणि पाकिस्तान कोण?

भाजपच्या शिबिरांमध्ये शिवसेना नंबर एकचा शत्रू असल्याचे सांगण्यात येते, त्यावर काय वाटतं, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर शिवसेना शत्रू वाटत असेल तर मग चीन आणि पाकिस्तान कोण? असा सवाल करतानाच शिवसेना नंबर वनचा शत्रू असल्याने त्यांचं चीन आणि पाकिस्तानकडे दुर्लक्ष झालं असावं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. उद्या जर युद्ध भडकलेच तर हिंदुस्थानची त्याला तयारी आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकद्वारे ब्लॅकमेलिंग होत असल्यानं तरूणीची आत्महत्या

News Desk

BMC Elections: मुंबई पालिकेसाठी भाजपचा पुढचा प्लॅन काय?

Manasi Devkar

तिसऱ्या दिवशीही जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन सुरु

News Desk