HW News Marathi
देश / विदेश

ढगफुटीने सहा जणांना बळी

जम्मू- काश्मीर- जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील थात्री येथे गुरुवारी सकाळी पहाटे ढगफुटी होऊन नद्यांना पूर आला आहे. यात सहा जण ठार झाले असून 11 जण जखमी आहे, गुरुवारी सकाळी ही भीषण घटना घडली. सध्या परिसरात बचाव कार्य सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या अनेक गावांना पुराचा फटका बसला असून अनेक घरे वाहून गेली आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पहाटे दोनच्या सुमारास परिसरात जोरदार ढगफुटी झाली. परिणामी अनेक घरे वाहून गेली आहेत. मलब्याखालून सहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यात एका बालकाचा समावेश आहे. या सर्वांचा दबून मृत्यू झाला. इतर आणखी काहीजण मलब्याखाली दबले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी यांना पाकिस्तानला मदत करायची आहे | रविशंकर प्रसाद

swarit

हनी ट्रॅपमध्ये अडकले ५० भारतीय जवान ?

News Desk

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याचा अमेरिकाचा दावा भारताने फेटाळून लावला

News Desk