HW News Marathi
महाराष्ट्र

ती दहा मते कोणाची

मुंबई: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे विजयी झाले. महाराष्ट्रातील मतदानाचा विचार करता विरोधकांची किमान १० मते फुटल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान १० सदस्यांनी मीरा कुमार यांना मतदान न करता सत्ताधारी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे दिसते आहे. आता ही मतं काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची? अशी कुजबूज सुरू झाली आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत झाली. निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना २०८ मते मिळाल्याचे सांगण्यात येतं. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास कोविंद यांना भाजप १२२, शिवसेना ६३ आणि त्यात अपक्ष १३ अशी एकूण १९८ मते मिळणे अपेक्षित होते. पण कोविंद यांना एकूण २०८ मते मिळाली आहेत. तर मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली आहेत. मतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास कोविंद यांना १० मते अधिक मिळाली आहेत. आता ही १० मते नक्की कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहाेचल्या! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna

सर्वसामान्यांची पिळवणूक करणारा अर्थसंकल्प! – अशोक चव्हाण

News Desk

परमबीर सिंगांचे भाजप नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधींची राजकीय वर्तुळात चर्चा!

News Desk