HW News Marathi
महाराष्ट्र

महबिजकडून शेतकऱ्यांची फसवणूक

 

अमरावतीः बनावट बियाणे पेरल्यामुळे पीकं उगवलीच नसल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शासनाच्या महाबिजने शेतकऱ्यांना हे बियाणे पुरविले होते.

महाबिजच्या सोयाबीन बियाणाची अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. सवलतीत हे बियाणे उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी महाबीजला पसंती दिली. मात्र पेरणीनंतर हे बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

या संदर्भात तालुका कृषी अधिकांऱ्याना विचारणा केली असता, आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असून या सर्व तक्रारी सोयाबीन पिकाच्या असून महाबीज कंपनीच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात तालुका स्थरीय चौकशी समिती नेमली असून लवकरच नागपूरवरून अहवाल येणार असल्याची माहितीही कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

न्यायमूर्ती लोयाची चौकशी का थांबवतायत | पृथ्वीराज चव्हाण

News Desk

कोरोनाची लागण झाल्यास त्याची व्याप्ती वाढू शकते मात्र घाबरण्याचे कारण नाही !

swarit

Jayant Patil HW Exclusive : …म्हणून शरद पवार अस्वस्थ आहेत !

News Desk
मुंबई

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास विरोध

News Desk

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कजवळचा महापौर बंगला देण्यास विरोध होत आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करण्यासही जनहित मंच या संघटनेने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी प्राथमिक सुनावणी झाली. पुढील आठवड्यात सविस्तर सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट करत सुनावणी तहकूब करण्यात आली.

जनहित मंचाच्या वतीने भगवानदास रयानी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार सरकारी बंगला स्मारकासाठी देणे सर्वोच्च न्यायालयाच्या 2013 मधील आदेशानुसार केंद्र सरकारने 2014 मध्ये काढलेल्या अधिसूचनेचा भंग आहे. राजकीय नेत्याच्या स्मारकासाठी अशा पद्धतीने बंगला देता येत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. सरकारी निवासस्थान असलेल्या बंगल्यात स्मारक करता येत नाही, असा दावा करत याबाबत मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनाही कळवण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Related posts

वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

News Desk

आरे परिसरात अग्नितांडव

News Desk

मरेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर दरम्यान रेल्वे रुळाला तडे

Gauri Tilekar