HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री !

नांदेड | देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री, अशा खोचक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये आज (१२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर घाणाघाती आरोप केले. नांदेडच्या प्रचार करण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

मुख्यमंत्री पाणी प्रश्नावर काहीच करत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पण तरीही राज्यातले पाणी गुजरातला वळवायचे काम सुरू आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र हाताची घडी घातली आहे, कारण बसवलेला मुख्यमंत्री काय बोलणार?, अशा शब्दांमध्ये राज यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

पुढे राज ठाकरे असे देखील म्हणाले की, राज्यातील २४ हजार गावे, १५१ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मग सरकारने पाण्यासाठी काय योजना केल्या? राज्यात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या असा दावा मुख्यमंत्री करतात. कुठे आहेत या विहिरी? असा सवाल राज यांनी उपस्थित केले. राज्यातील परिस्थिती भीषण असून पाण्याची समस्या गंभीर आहे. ग्रामीण भागात दुष्काळ असल्यामुळे राज्यातील युवकांचे लोंढेच्या लोंढे शहरात येत नाहीत. राज्यातील युवकांना नोकऱ्या नाहीत. मग मोदींचे अच्छेचे दाखविलेले स्वप्नांचे काय झाले? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुष्यात माझी एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणे नितीन गडकरी

News Desk

वाहतूक पोलिसांपुढे आता ‘नो वशिलेबाजी’

News Desk

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

News Desk