HW News Marathi
महाराष्ट्र

पत्रकार व डाॅक्टर यांच्यावरील होणारे हल्ले हे समाज स्वास्थ बिघडविणारे आहेत –  कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

उत्तम बाबळे

नांदेड :- मन स्थिर असेल तर सर्वच गोष्टी स्थिर असतात. स्वतःबद्दल विचार करायला शिका. आपण इतराबद्दल जेवढा विचार करतो तेवढा स्वतःचा करीत नाही. जे एकांतातही निवांत असतात ते खरे स्वास्थ. आज आपण बघतो की, पत्रकार आणि डॉक्टर यांच्यावरील होणारे हल्ले हे समाज स्वास्थ बिघडविणारे आहेत. त्यामुळे वैयक्तीक स्वास्थ्यासह सामाजिक स्वास्थही जपणेही तेवढेच आवश्यक आहे, असे मत कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

७ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आरोग्य केंद्राच्या वतीने ‘मानसिक स्वास्थ – जीवनावश्यक घटक’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक तथा विभागप्रमुख मनोविकार तज्ज्ञ डॉ. प्रसाद देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ.आर.एम. मुलानी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुंगल यांची उपस्थिती होती.जागतिक आरोग्य दिनानिमित्त दरवर्षी कोणत्याही एका आरोग्य विषयावर जागतिक पातळीवर जनजागृती करण्यात येत असते. गेल्यावर्षी डायबीटीक या विषयावर जनजागृती करण्यात आली होती. यावर्षी मनोविकार किंवा नैराश्य या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. ‘चला बोलूया, नैराश्य टाळूया’ या बोधवाक्यासह विद्यापीठामध्ये ज्येष्ठ प्राध्यापक मनोविकार तज्ज्ञ डॉ. प्रसाद देशपांडे यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्यांनी अपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पूर्वी नैराश्याचे प्रमाण कमी असायचे त्याचे कारण गावातील पारावर अथवा चावडीवर मनमोकळ्या होणाऱ्या गप्पा. थोडक्यात मनमोकळे करणे म्हणजेच नैराश्य न येऊ देणे होय. आजच्या धावपळीच्या, कामाच्या ताणतणाच्या व्यस्थ जीवन शैलीमुळे मनमोकळे करायला आपल्याकडे वेळच नाही, म्हणून मनोविकारामध्ये वाढ होतांना दिसत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितले की, आहे त्यात आनंद मानने, कुणाकडून कशाचीही अपेक्षा न ठेवणे, आर्थिक नियोजन व्यवस्थीत ठेवणे, वेळेचे नियोजनव्यवस्थीत असणे, मित्र आणि नातेवाईक यांच्या सोबत नियमितपणे संवाद साधने, कुणाच्याही टीकेला नजुमानने या काही गोष्टी अवलंबिल्यास नैराश्य स्थितीकडे जाण्याचे टळते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रगल्भता जी वयोमानानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक येत असते. चर्चासत्राची प्रस्तावना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुंगल यांनी केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. यावेळी विद्यापीठ परिसरातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, मनसेचा सरकारला टोला

News Desk

ST कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी अनिल परबांचे आवाहन

News Desk

पुणे पदवीधर शिक्षकसाठी विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार…

News Desk