HW News Marathi
मनोरंजन

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

मुंबई- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती सध्या खूपच नाजूक झाली आहे. इतकच काय तर त्यांना आता ओळखणंही कठीण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे रूग्णालयातील फोटोस व्हायरल झाले असून आजारपणामुळं विनोद खन्नांची झालेली अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मागील आठवड्यात विनोद खन्ना यांना चर्नी रो़डच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. खन्ना यांना मूत्रपिंडाचाकॅन्सर असल्याचं तपासणीत समोर आल्याचं सूत्रांकडून समजतं. याविषयी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होतअसून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांचा मुलगा राहुल यानं दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माटुंग्याच्या फुलमार्केटमध्ये गणेश भक्तांची गर्दी

News Desk

बॉलिवूडच्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Gauri Tilekar

‘आर्ट एक्सपो’च्या प्रदर्शनात हातमागाचे वैविध्य पाहून ‘श्रेया बुगडे’ झाली दंग

News Desk
महाराष्ट्र

…म्हणून सोलापूरात विरोधकांच्या संघर्ष यात्रेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

News Desk

अभिराज उबाळे

– शेतकऱ्यांची देणी थकवणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना समज देऊ – राधाकृष्ण विखेपाटील

पंढरपूर – स्थानिक काँग्रेसच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी जर शेतकऱ्यांची देणी थकवलेली असतील तर हे चुकीचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे अशी देणी असतील तर आपण त्यांना योग्य समज देऊ असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. विरोधी पक्षांच्या सोलापूरमधील संघर्ष यात्रेकडे त्यामुळेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झालीय.

विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आंदोलनं करत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची देणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी थकवलीत. जिल्हा बँकेची नियमबाह्य कर्ज देखील या नेत्यांनी घेतलेली आहेत. यावर विखे पाटलांना छेडले असता त्यांनी हे दुर्दैव असल्याची कबुली देत, आपण यामध्ये लक्ष घालून हि देणी देण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांची एफ आर पी थकवणाऱ्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करावी असा सल्ला त्यांनी प्रशासनास दिला.

एकीकडे कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबलेला आहे. आणि दुसरी कडे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याकडे संघर्ष यात्रेच्या मंगळवेढ्याच्या सभेचे आणि पंढरपूरचे नियोजन होते. मात्र काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देणी थकवल्याने शेतकऱ्यांनी या संघर्ष यात्रेकडे सपशेल पाठ फिरवलीय. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कर्ज माफी करण्याची मागणी करतानाच त्यांच्याच नेत्यांकडे देणी थकल्याने सोलापुरात त्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र दिसत आहे . या कारणांमुळे मंगळवेढा आणि पंढरपूर मधून या यात्रेने काढता पाय घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Related posts

१८-४४ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लसीकरण केले जाणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk

राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनींचं नुकसान, ८१ टक्के पंचनामे पूर्ण विजय वडेट्टीवार यांची माहिती!

News Desk

बैलगाडी नदीत पडून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू 

News Desk