HW News Marathi
देश / विदेश

अखेर दारूवर उतारा सापडला

मुंबई- दारूचे व्यसन रोखणाऱ्या औषधाचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. रोज सायंकाळी हे औषध दिल्यास मद्यपिचे व्यसन सुटू शकेल. जगभरात मद्यपींची संख्या मोठी आहे. मद्यपानानंतर मानवामध्ये कोणकोणते बदल होतात आणि त्यावर नियंत्रण कसे राखावे, या दृष्टीने आम्ही अनेक वर्षांपासून संशोधन करत होतो, असे ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी जॉन जेकब्सन याने सांगितले. उंदराला औषध देऊन हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

प्रत्येक बदलानंतर आपले शरीर आणि मेंदू काही इशारा देत असतो. मद्यपानानंतर व्यसन रोखणारे हे औषध सेवन केल्यानंतरही मेंदूने काही इशारे दिले त्याची नोंद घेण्यात आल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.मद्यपान केल्यानंतर मानवी शरीरातील मेंदूची भूमिका तपासण्याचा आमचा प्रयत्न होता, असे जेकब्सन यांनी सांगितले. मद्यपीला आम्ही तयार केलेले औषध दिल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. मद्यपीला सायंकाळी मद्यपान करण्याची इच्छा झाली नाही, असेही जेकब्सन म्हणाले. हे संशोधन ‘ब्रेन बिहेविअर अँड इम्युनिटी’या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांची साडी उतरविण्या

News Desk

महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे राज्यभर बंदची हाक

News Desk

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक

News Desk
देश / विदेश

चक्रीवादाळाने इतिहास भूगोल बदलला

News Desk

फ्लोरिडा-फ्लोरिडामध्ये नुकतेच आलेल्या इरमा वादळ्याने या परिरसराची भौगोलिक ओळख पुसून टाकली आहे. परिसरातील नव्वद टक्के घरे उध्वस्त झाली आहेत. सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले नागरिक आपल्या घराकडे परतु लागले आहेत. परंतु घरं भूईसपाट झाल्याचे पाहून अनेकांना आश्रु आले. परिसरातील सर्व घरे अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत. एकही घर शिल्लक नाही. जे शिल्लक आहेत. त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे घरी परतुन राहायचे कुठे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. मालमत्तेसोबत घरातील अनेक मौल्यवान वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे. कार, वाहने यांचेही नुकसान झाले आहे. एकूणच या वादळाने सर्वस्व उध्वस्त केल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वादळ शमले असले तरी त्याच्या कटू आठवणीतून बाहेर येण्यासाठी कित्येक वर्ष द्यावी लागणार आहेत. सध्या घरांची दुरूस्ती करून निवारा निर्माण करण्यावर येथील नागरिक भर देत आहेत. दरम्यान, घरी परतलेल्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. वादळात वीजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. तो पूर्ववत होत नसल्याने नागरिकांनी गर्मीने हाल सुरू आहेत.

Related posts

काश्मीरमधील कलम ३५-अ आणि ३७० हटवण्यासाठी मोदी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

मराठमोळे मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला

News Desk

मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर ?

News Desk