HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानसारख्या बदमाश देशाला चोरून प्रेमपत्र पाठवायची आवश्यकता काय ?

मुंबई | “पाकिस्तानसारख्या बदमाश देशाला चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे ?”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘राष्ट्रीय पाकिस्तान दिना’च्या शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. यावरूनच आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“पाकिस्तानला शुभेच्छा देण्यात चुकीचे काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले तर आपल्यात दुष्मनी ठेवण्याचे काही कारण नाही. उलट मैत्री असावी. मात्र, भारताकडून पाकिस्तानला पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छांचा पाठविण्यात आला हे आपल्याला भारत सरकारकडून कळायला होते. परंतु, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून कळले. नरेंद्र मोदी यांनी हे जाहीर का केले नाही ? एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरुन लव्ह लेटर पाठवत बसायचे. यात मोदींचा दुटप्पीपणा दिसतो”, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम : ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

Aprna

कर्जमाफीच्या बदल्यात ‘सेक्स’

News Desk

‘हा’ केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की…’  सुब्रमण्यम यांनी अर्थमंत्र्यांना सुनावलं

News Desk