HW News Marathi
मनोरंजन

पोकळ धमक्या देणारा एक मुलगा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवेळी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा करतात, त्यामुळं त्यांची विश्वासार्हता कमी होत चाललीय. लोकांची सहानुभूती आणि त्यापेक्षाही शब्दांची किंमत कमी होत चाललीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एका चिडक्या शाळकरी मुलासारखी उद्धव यांची अवस्था होत चाललीय.

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवल्या त्याला महाराष्ट्रातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तो निकालाच्या स्वरूपात. मात्र, निकाल संपल्यानंतर नरमाईची भूमिका घेत शिवसेना सत्तेत सहभागी झाली.

मुख्यमंत्री पद किंवां उपमुख्यमंत्री पद तर सोडाच पण गृह किंवा महसूल अशा महत्त्वाच्या खात्यासाठी साधी विचारणाही शिवसेनेला भाजपकडून झाली नाही. अजूनही उद्धव यांनी भाजपची साथ सोडलेली नाही. त्यामुळं भाजपला विरोध म्हणून शिवसेनेला मतदान केलेल्या मतदारांचा हा एकप्रकारे विश्वासघातच आहे. या वागण्यामुळं उद्धव यांच्या विश्वासार्हतेला काहीसा तडाच गेलाय, असं म्हणावं लागेल.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेनं एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोरही आले. या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, इथंही सत्ता स्थापनेसाठी त्यांना भाजपचाच आधार घ्यावा लागला. ज्या कट्टर शिवसैनिकांनी जिवाचं रान करून, प्रसंगी जीवाची पर्वा न करता सर्वाधिका जागा निवडून आणल्या त्यांचाही इथं विश्वासघात झाला. त्यामुळं या निवडणुकीतही उद्धव यांनी शिवसैनिकांची विश्वासार्हता गमावली.

मुंबईवर शिवसेनेची पकड मजबूत असल्याचं महापालिका निवडणुकीतही स्पष्ट झालं. तर दुसरीकडे मुंबई मनपामध्ये फारसं संख्याबळ नसलेल्या भाजपनं जोरदार मुसंडी मारून शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागा कमी मिळवल्या आहेत. भाजपनं या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या महापालिकेत्या कारभाराचे जाहीरपणे वाभाडे काढले होते. त्यानंतर भाजपच्याच मदतीनं शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यावर प्रत्येक मराठी माणसाला हाच प्रश्न पडला असावा की, शिवसेनेनं असं का केलं ? इथंही उद्धव यांनी थोडी विश्वासार्हता गमावली.

शेतकरी संपाच्यावेळीही उद्धव यांनी पाठिंबा काढून घेण्याचा इशारा सरकारला दिला होता. मात्र, यावेळीही तो पोकळ इशाराच ठरला. शेतकऱ्यांना शिवसेना आपल्या पाठिशी राहिल असं वाटलं होतं, इथंही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आलीय. शिवसेनेला अजूनही पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रातील बुद्धीजीवीपैकी काहींनान याची कल्पना आहे. इथंही उद्धव यांची विश्वासार्हता कमी झालीय.

आता, राष्ट्रपती पदासाठी भाजपनं रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिलीय. उद्धव यांनी दलित मतांसाठी ही भाजपची खेळी असल्याची टीका केली होती. मात्र, मी दाव्यानं सांगतो की उद्धव हे भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारालाच पाठिंबा देतील, जे त्यांनी आजवर केलंय अगदी तसंच यावेळीही होईल.

मला वाटतं, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतून भाजपनं शिवसेनेचा पाठिंबा काढला तर शिवसेनेचं काय होईल. पण उद्धवजी तुमच्या या खोट्या इशाऱ्यांमुळं शिवसेनेच्या वाघाच्या अस्तित्वाबद्दल मतदारांच्या मनात संशय निर्माण होतोय. महाराष्ट्र आणि मराठी माणसाला हवीय ती सशक्त शिवसेना.

( सुजीत नायर – लेखक हे www.hinduworld.co.in या न्यूजपोर्टलचे व्यवस्थापकीय संपादक आहेत)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने करणार सन्मानित

News Desk

संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत

News Desk

‘छपाक’ सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लूक आऊट

News Desk