HW News Marathi
व्हिडीओ

Vidarbha Movement | वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनांचा भाजपला विसर ?

गेल्या अनेक दशकांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे. विदर्भाचा विकास व्हायचा असेल तर वेगळे विदर्भ राज्य व्हायला हवे असे अनेक विदर्भवादी नेत्यांचे आणि विदर्भातील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. १९२० साली नागपूर कॉंग्रेस अधिवेशनात वेगळ्या विदर्भ राज्यानिर्मितीचा ठराव एकमतानं मंजूर झाला तसेच १ ऑक्टोबर १९३८ रोजी आठ जिल्हे असलेला विदर्भ राज्याचा प्रस्ताव एकमतानं पारीत करण्यात करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विश्वास देणारे भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सत्तेत आल्यावर विदर्भाचा मुद्दा बाजूला सारला असल्याचे विदर्भवादी नेत्यांचे म्हणणे. तर आता नागपुर मधील एका कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Deepak Kesarkar यांच्या भेटीनंतर काय म्हणाले Sambhaji Raje?

News Desk

Republic Day |हे आहेत दिल्ली गाजवणारे महाराष्ट्राचे चित्ररथ

News Desk

घटनापीठ म्हणजे काय?, ShivSena कुणाची? गुरुवारी ठरणार

Manasi Devkar